महिला कर्मचाऱ्यांनो घाबरू नका शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे - ADV. यशोमती ठाकूर

Update: 2021-04-19 16:40 GMT

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांची आत्महत्या आणि महिला वनकर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि वरिष्ठांकडून होणारा जाच इ. तक्रारींची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि मेळघाटच्या पालकमंत्री adv. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील दुर्गम भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

ADV. यशोमती ठाकूर यांनी महिला वनकर्मचाऱ्यांना दिला विश्वास महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार करणे आवश्यक. कुठेही अपप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्या. शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे आहे. असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री adv. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना दिला.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, 
नरक्षक दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आणखी कुणी महिला कर्मचारी दिपाली चव्हाण बनू नये तसेच महिलांच्या संरक्षणाची जबाबदारीच नाही तर कर्तव्य म्हणून मी याठिकाणी दौरा केला. महाराष्ट्रात महिला अनेक क्षेत्रांत आघाडीने कार्यरत आहेत. अशा ठिकाणी त्यांना काम करताना संरक्षक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. महिला वनकर्मचाऱ्यांशी बोलताना अवमानजनक भाषेचा वापर होणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी कारणे दाखवा नोटीस बजावणे, त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी न देणे, कॅम्पवर स्वतंत्र स्वच्छतागृह नसणे, मानसिक छळ, विशेष व्याघ्रसंरक्षक दलातील वनकर्मचाऱ्यांचे पगार वेळेत न होणे अशा तक्रारी येत आहेत. वन प्रशासनाने त्यांची तात्काळ दखल घेऊन तक्रारींचे निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी वन प्रशासनाला दिले. महिला वनकर्मचाऱ्यांना कुठलीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा,
असे आवाहनही त्यांनी केले.

विशाखा समितीचे कार्य योग्यरित्या चालवा

महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य योग्यरित्या चालणे आवश्यक आहे. प्रत्येक तक्रारीची वेळीच दखल घ्यावी. महिला वनकर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी. त्यासाठी त्यांना परवानगीची गरज पडू नये, असे निर्देश त्यांनी वनधिकाऱ्यांना दिले. महिला वनकर्मचा-यांचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिटेशन कॅम्प घेण्याचीही सूचना त्यांनी केली.

Tags:    

Similar News