राज्यात नव्या सरकारच कोणतंही काम सुरू नाही- पंकजा मुंडे

Update: 2020-02-21 09:32 GMT

राज्यात नव्या सरकारचं कसलंच काम सुरू नाही. केवळ जुन्या योजना रद्द करणे आणि त्याचा अहवाल मागणे एवढंच सरकारचं काम सुरू असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांनी केलाय. जनतेतून थेट सरपंचाची निवड करण्याचा निर्णय रदद करण्याच्या मुद्द्यावरुन त्यंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.

“जनतेतून थेट सरपंच निवड हा लोकांच्या हिताचा निर्णय होता. तो राष्ट्रवादीच्या सरपंचानाही आवडला होता. या निर्णयामुळे घोडेबाजार रोखण्यात यश आलं होत. लोकांना आवडलेले निर्णय तरी किमान सरकारने बदलू नयेत” असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

 

Similar News