Home > News > राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारीलाच का साजरा करतात ?

राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारीलाच का साजरा करतात ?

राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारीलाच का साजरा करतात ?
X

भारतातील अनेक विद्वान व्यक्ती ज्यांनी त्यांचे कार्य आणि त्याप्रती असलेली साधना नेहमी जीवनात ठेवली अश्याच व्यक्तींमुळे भारत जगात ओळखला जातो .या महान व्यक्तीच्या कामाचा गौरव म्हणून अनेक दिवस साजरे केले जातात . अश्याचपद्धतीने भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.






राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारीलाच का साजरा करतात ?

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये?

अखेर २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचे ठरले आणि तेंव्हापासून आतापर्यंत २८ फेब्रुवारीला साजरा केला जातो .

Updated : 28 Feb 2023 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top